रविवार, २६ जानेवारी, २०२५

पाक्षिक सदर - अडगळीतील समृद्धी लेख-2 - मोट

                           मोट
         भल्या पहाटे गावखरीच्या विहिरीवर घुमणाऱ्या मोटंच्या मंजुळ ललकारीने गाव हळूहळू जागं व्हायचंनाना आपल्या गोड आवाजात वडिलावंss वडिलावंss! गवळ्याss बैलाला रंss वडिलावंss! हरण्याss बैलाला रं वडिलावंss! असं म्हणत एकेका बैलाचे नाव घ्यायचाथोडा वेळ थांबायचा आणि मग हांss चलंss! असं म्हणताच कुई कुई कुई कुई आवाज आणि तो संपता चलगेच भडाडाडाss असा आवाज व्हायचानानाच्या या ललकारी बरोबरच सारं गावंही कामाला जुंपायचंआम्हा लहानग्यांची जाग देखील त्या ललकारीनेच उमलायचीबाहेर ओटा-अंगण सडा सारवनाने सुगंधीत झालेलं असायचंउगवतीचं तांबूस पिवळं ऊन हळूहळू उजेडात मिसळून जाऊ लागायचंगडद सावल्याही हळूहळू उजळू लागतघराघरात कामाची एकच घाईगर्दी सुरु होतमग गावखरीच्या बाजूने येणारा आवाजही हळूहळू कमी होत जायचामात्र एव्हाना नानाचा एक पारुग पुरा झालेला असायचा
         गावखरीची विहीर आमच्या घरापासून जवळच होतीगाव आणि विहिरीच्या मधून एक मोठी वाट जात होतीत्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ असायचीचांगली पाच परसाची ही विहीर अख्या गावखरीच्या नंबराला पाणी पुरवत होतीसात हाताचा घेर असलेली ही विहीर काळ्या पाषानी दगडांनी बांधलेली होतीकाठापासून एक परस उंच आणि पुढे उतार असलेली धावदेखील भक्कम कोरीव चिरांची होतीधावेचा उतार चांगला पन्नास-साठ फूट लांबीचा असावाविहिरीच्या बाजूला धावेवर मजबूत दोन दगडी पायटे बसवलेले होतेत्यांच्या खाली दगडी तोडी बसवल्यानं एक थारुळं तयार झालं होतंया पायट्यांच्या आतल्या तोंडाला जी भोकं होतीत्यात दोन चौकोनी मजबूत लाकडी खांब उभे केले होतेया खांबाना आधार म्हणून धावेच्या उताराच्या बाजूला दोन तिरके लाकडी खांब विशिष्ट पद्धतीने जोडले गेले होतेउभ्या  खांबांच्या खालच्या वरच्या अशा दोन्ही टोकांना गोल भोकं होतीवरच्या बाजूला एक  जाड लोखंडी सळी घालून त्यात मघोमध एक लाकडी चाक वसवलेले होतेतर खालच्या बाजूला एक लांब लाकडी पसरट चाक बसवलेलं होतं.  या खालच्या पसरट चाकाला कणा असं म्हटलं जायचंआणि या सर्व व्यवस्थेलावडवान ’ असं म्हटलं जातं असे.  या वडवानामुळेच मोटंचं पाणी थारूळ्यात पडून पाटातून पिकाला जायचंविहिरीच्या काठावर मावळतीच्या दिशेला मोठा लिंबोरा होताविहिरीच्या धावेवर दिवस भरत्याची सावली पडायचीत्यामुळे मोट दिवसभर चालली तरी बैलं थकत नसतं
          मात्र गावखरीवर पाण्याची पाळी असली की चांदणी उगवताच नाना खरसड वस्तीवरून मोटंचा सारा सर्जाम गाडीत भरून निघायचासंग कोणीतरी जोडीदार असायचाचमग विहिरीवर पोहोचताच दोघेजण गाडीतून एकेक करत मोटंसह सारं सामान खाली घ्यायचे अन मग मोटंची जुपाजूपी व्हायचीनानाची मोट म्हणजे लोखंडी जाड पत्र्याचा वरची बाजू उघडी असलेला एक घनाकार डबाच होतामोटंचा वरचा उघडा भाग बुडाच्या भागापेक्षा थोडा लांब होताया खालच्या बाजूच्या मधोमध पत्र्याची एक गोल झडप (दरवाजावर उचलली जाईल अशारितीने बिजागरीने बसवलेली होती. मागच्या बाजूच्या दोन्ही बाजूला एक साखळी बसवून साखळीच्या मध्यावर एक लोखंडी कडी होतीतशीच साखळी पुढच्या तोंडालाही होतीसुमारे दीड-दोनशे लीटर पाणी मावेल असा तिचा आकार होता. 
              सुरवातीला मोट थारूळ्यावर ठेवली जायची. एक लांब जाड असा दोर ज्याला नाडा म्हटलं जायचं तो नाडा वडवानाच्या वरच्या चाकातून ओवून मोटंच्या मागच्या बाजूच्या साखळीच्या कडीला घट्ट बांधला जायचा. नंतरमोटंच्या पुढच्या बाजूच्या साखळीच्या कडीला आणखी एक दोर घट्ट बांधला जायचा. त्यास सौंदर म्हटले जायचं. मग नाना शिळवटीत दोन बैल झुंपायचा. आधी शिळवटीच्या वरच्या जुवावर नाडा आणि मग शिळवटीच्या खालच्या पट्टीला सौंदर गुंडाळून घट्ट बांधले जायचे. हे करताना नाडा सौंदरापेक्षा लांबीने जास्त घेतला जायचा.  मोट विहिरीच्या पाण्यात समतल राहावी म्हणून ही व्यवस्था असायची. मग दोन्ही बैलं धावेच्या पुढच्या टोकाला उभी करून नाना आपल्या जोडीदाराच्या मदतीने मोट हळू हळू विहिरीत सोडत असे. एकदा का मोट वडवानातून विहिरीत गेली की मग दोन्ही बैलं मागे मागे सरकत वडवानापासून विशिष्ट अंतरावर येऊन थांबत आणि येथूनच नानाची ललकारी सुरु होत. 
          मोट पाण्यात टेकताच खालच्या बाजूची झडप पाण्यामुळे वर उचलली जात  मोटेत पाणीभरू लागेमोट पाण्याने पूर्ण भरेपर्यंत नाना बैलांची नावं घेऊन आळवत असतमोट पूर्ण भरताच नाना हांsss चलंsss!असं म्हणायचादोन्ही बैलं जोर लावून धावेवर चालू लागायचीमोट पाण्याच्या पातळीच्या वर येताच खालून उचललेली झडप वरच्या पाण्याच्या दाबाने पुन्हा खालीघट्ट बसायचीपाण्याने पूर्णपणे भरलेली मोट वर येत असताना चाकांचा  नाडा-सौंदर यांचा कुईकुई असा मंजुळ आवाज यायचामोट वडवानाजवळ येताच वरचा नाडा ताणला जाऊन मोटचे तोंडनेमकं थारूळ्यावर टेकत  आतील पाणी भडाडाss! आवाज करत थारूळ्यात पडायचं आणि पाटाने पिकाला जायचंयावेळी बैलं धावेच्या पुढच्या टोकापर्यंत पोहचत असतमोट रीती झाली की नाना दोन्ही बैलांच्या मोरखीला लावलेला कासरा मागे ओढत आणि बैलं पुन्हा मागे मागे सरकू लागतयाचवेळी नानाच्या ललकारीचा अंतरा सुरु व्हायचादुसरा जोडीदार दारूळ्या म्हणून शेतातदारं धरायचाअशा प्रकारे न्याहारीच्या वक्तापर्यँत नानाची मोट चालायचीमोट ओढताना बैलांना थकवा येऊ नये आणि पिकालाही पाणी मिळावे असा दुहेरी हेतू या ललकारी गाण्यात होता
               साधारणत: पावसाळा संपून हिवाळा सुरु व्हायच्या दरम्यान या मोटा विहिरीवर दिसायच्या. खरीपाची पिकं शक्यतो पावसावर येत होती. दुष्काळाचा काही काळ वगळता पाऊसकाळ त्याकाळी अधिक असायचा. त्यामुळे विशेषतः रब्बी हंगामातच मोटा चालवल्या जात असत. पिकांना पाणी पुरविण्याचं मोट हे त्याकाळी एकमेव साधन होतं. आमच्या गावात सर्वच विहिरीवर अशा मोटा चालायच्या. पिकांना पाणी पुरविण्यासाठीची ही मोटंची योजना म्हणजे कृषी संस्कृतीला समृद्ध करणारी क्रांतिकारी घटना म्हटली पाहिजे. 
          भारतीय कृषी संस्कृतीचा प्रारंभ प्राचीन काळात झाला आहेभटकंतीचे जीवन सोडून स्थीर जीवन स्वीकारल्यावर मानवाने हळूहळू शेती आणि पशुपालन हे दोन मुख्य व्यवसाय सुरु केलेसामान्यतभारतीय कृषी संस्कृतीची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे म्हटले जातेयाच काळात मानवाने अन्न पिकवायला आणि स्थीर जीवन जगायला सुरुवात केली..पू७००० च्यासुमारास ‘मेहरगढ’ (बलुचिस्तानपाकिस्तानयेथे शेती आणि पशुपालनाचा पुरावा आढळतोयाच काळात मानवाने शेतीसाठी प्राणी (बैलआणि गहू  जवस ही पिकं घ्यायला सुरू सुरुवात केली होतीही शेती पूर्णतः नैसर्गिक आणि हंगामी स्वरूपाची होतीप्रारंभीच्या काळात लहान लहान गटवा समूह करून मानव त्याकाळी शेती करत असेपुढे हळूहळू शेतीसाठी पाण्याची साठवण करत पिकाच्या सिंचनाला प्रारंभ झाला
           सिंचनाचा प्रारंभ साधारणतः सिंधू संस्कृतीच्या काळात झाल्याचे मानले जाते.  या काळातसिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित असलेल्या हडप्पा संस्कृतीत शेतीचे विस्तृत पुरावे आढळतातयाच काळात नहर किंवा पाटयाद्वारे पाणी आणणे आणि जमिनीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हीकामे सुरू झालेली होतीपुढे वैदिक काळात शेतीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले दिसतेशेतीच्या नांगरटीसाठी बैलांचा उपयोग आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रारंभिक स्वरूप यांचा उल्लेखही ऋग्वेदात आढळतोत्यानंतर मौर्य साम्राज्याच्या काळात कृषीसंस्था अधिक सुव्यवस्थित झाली असल्याचे दिसतेनंतर मध्ययुगीन काळात शेतजमिनींचा विस्तार होऊन विविध पिके घेतली जाऊ लागलीविशेषतः याच काळात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून लोखंडी औजारेपाणी उपसण्यासाठीची साधने आणि त्यासाठी प्राण्यांचा वापर सुरु झालायावरून याच काळात विहीर मोट यांचा शेतीसाठी वापर सुरु झाल्याचे दिसून येते
        भारतात विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेचा वापर वैदिक काळात ..पू१५०० -१०००या दरम्यान  सुरू झाल्याचे उल्लेख आहेतसिंधू संस्कृती आणि नंतरच्या हडप्पा संस्कृतीमध्ये विहिरी आणि पाण्याच्या व्यवस्थेचे ठळक पुरावे सापडतातसिंधू संस्कृतीतील काही स्थळांवर विहिरींचे अवशेष आढळले आहेतया विहिरींचा उपयोग सिंचनासाठी करण्यात येत असेनंतर वैदिक काळात उत्तर भारतात गंगेच्या खोऱ्यात विहिरींच्या पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू झाला होताया काळात मोटेचा थेट उल्लेख नसला तरी बैलाच्या साहाय्याने सिंचन केले जात असल्याचे सूचित केले आहेदक्षिण भारतातील याच काळात दुष्काळी भागांमध्ये देखील मोटेचा वापर केला जात होतामौर्य साम्राज्याच्या काळात चाणक्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात मोटेचा उल्लेख आहेया काळात लोखंडी नांगरासोबतच मोटेचा वापर शेतीच्या कामासाठी केला जात होतापुढे मध्ययुगीन काळात पर्शियन चाकाचा (रेहटभारतात मोठ्या प्रमाणावर वापर सुरूझालाउत्तर भारतात आणि राजस्थानात विशेषतः दुष्काळी भागांमध्ये विहिरी आणि मोट यांचा उपयोग वाढलाया काळात मोटेसाठी बैल किंवा उंटासारख्या प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला
                 महाराष्टाच्या कृषीसंस्कृतीत मध्ययुगीन काळापासूनच सिंचनासाठी विहीर व मोट यांच्या वापर अधिक प्रमाणात असल्याचा पाहावयास मिळतो. मोट हेच पिकांना पाणी देण्याचे प्रमुख साधन म्हणून त्याकाळी वापरले जात होते. महाराष्ट्र हा तसा विषम हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाणही कमी जास्त असल्याचे जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात कधीओला तर कधी सुका दुष्काळ पडल्याचे अनेक संदर्भ सापडतात. सिंचनाची ही परंपरा येथे कित्येक शतकांपासून चालू होती. महाराष्ट्रात लोखंडी पत्रा आणि कातडी अशा दोन प्रकारच्या मोटा वापरल्या जात होत्या. दोन्हीचेही कार्य सारख्याच प्रकारचे होते.  
         एक काळ असा होता की पहाटे तांबडं फुटल्यावर कोंबड्याचं आरवणं आणि मोटेवरची ललकारी यांनी गाव शिवार दुमदुमून जात असेआपला मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे गावातील सर्वच लोक या व्यवसायात गुंतून राहत होतेप्रारंभीच्या काळात घरातील सर्वच लोक शेतीची सर्व कामं करायचीप्रत्येकाची आवड  कामातील गती वा कोशल्य यानुसार कामं केली किंवा वाटली जात असतमोटकरी हे आपल्या कृषी संस्कृतीतील महत्वाचं आणि मानाचं पात्र होतेमोट हाकालने ही एक कलाच होतीबैलांशी लळा जिव्हाळा आणि गाता गोड गळा याद्वारे मळा फुलविण्याचे उत्तम कसब मोटकऱ्याकडे असेमोटकरी आणि दारूळ्या यांची जोडी जमली तर सुगी भरभरून साजरी होत असेदरवर्षी पडलेल्या पावसाचं प्रमाणविहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन त्याकाळी बागायती शेती केली जात असेत्यामुळे अन्नधान्य पिकांसह काहीच नगदी पिकांचे उत्पादन घेतलं जात असेलहरी किंवा बेभरवश्याच्या हवामानाच्या काळात मोटंच्या माध्यमातूनच वर्षभर लागणारी चंदी पिकत होतीधान्याच्या रूपातून घरात समृद्धीचं भरलेपण आणण्याचं मोलाचं कार्य त्याकाळी मोट करत असे
             विहिरीवर मोट सुरु असली की आसपासचे लोक पाण्याशी संबंधित कामं उरकून असतंपिण्याचं पाणी असो की सडा शिंपणासाठी लागणारं पाणी असोआसपासच्या बायांबापड्या बिनदिक्कत विहिरीवर येत असंतकोणी धुणं धुवायचंतर कोणी घरी पाणी घेऊन जायचंयाकामांच्या निमित्ताने गावात आलेल्या नव्याने आलेल्या सुनाबाळींच्या एकमेकींशी ओळखी व्हायच्यासुखदुःखाच्या गप्पा गोष्टी बोलल्या जायच्याकाही पुरुष मंडळी तर आपल्या आंघोळी देखील यापाण्यानं उरकून घेत असतंमोट चालू असली की जनावरांना पोटभर पाणी प्यायला मिळायचंशेळ्या-मेंढ्याचा कळप असो वा दुभती जनावरं असो त्यांची पाण्याची जागा हीच असायचीकामाला जाणारे लोक असोत वा शाळकरी मुलं असोत मोटंचं पाणी पिल्याशिवाय पुढं पाय टाकतनसंतवाटेनं जाणारा वाटसरूही मोटंच्या थंडगार पाण्यानं आपली तहान भागवूनच पुढच्या मार्गाला लागायचासणासुदीच्या काळात तर आमच्या गावखरीच्या विहिरीवर लोकांची खूपच वर्दळ असायची
          मोट हे केवळ पिकांना पाणी देण्याचं साधन होतं असं नव्हे तर मोटंच्या माध्यमातून गावची सामाजिकभावनिक  कौटुंबिक वीण अधिक घट्ट होत असेत्याकाळी विहिरीची संख्या खूपच मर्यादित होतीपांद किंवा खोलगट उताराच्या तळाशी विहिरी असायच्यात्यामुळे मोटचं पाणी ठराविक भागातच पोहचत असेम्हणूनच बागायची क्षेत्र त्याकाळी कमी प्रमाणात असायचेविहिरीवर एका वेळी एक किंवा दोनंच मोटा चालायच्याकधी कधी भावाभावात शेताच्या वाटण्या व्हायच्यात्यामुळे मोटच्या बाबतीत सर्वजण एकमेकाशी गुण्यागोविंदाने व सामंजस्याने वागायचेपिक  पाण्याची गरज पाहून एकमेकांना मदत करायचेविहिरीला पाणी अधिक असेल तर कधी कधी मोट आणि बैलासह शेजारच्या शेतकऱ्याला आपल्या वाटणीचं पाणी देखील दिले जायचेशेजारीपाजारीपाहुणेसोयरे यांना देखील मोटंच्या माध्यमातून मदत केली जात होती
            मोटकऱ्याला आणि दारूळ्याला न्याहरी घेऊन कारभारीन येत असे तेंव्हा नात्यांचे गोड नाजूक धागे अधिक बळकट होत असत. मोट हाकलणं हे मजेचे कामं वाटत असल्यामुळे घरातील अनेक मुलं मोटेकडं आकर्षिली जात होती. काही मुलं तर मोटेत बसून विहिरीत खाली वर येण्या- जाण्याचा आनंद घेत असत. शेती- मातीशी त्यांचा लळा- जिव्हाळा अधिक घट्ट होत असे. विहिरीवर पाण्या- धुण्याच्या निमित्ताने आलेल्या आसपासच्या व्यक्तींचे आपसात प्रेमाचे स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. कधी कधी नवी नातीही जुळली जायची. खरंच मोट हे त्या काळात ग्रामीण लोकजीवनाशी जोडले गेलेले एक प्रमुख असं कृषी साधन होतं. या मोटेशी संबंधीत गाव शिवाराशी अनेक प्रकारचे अनुभव व आठवणी जोडल्या गेलेल्या असायच्या. 
         आज आधुनिक काळात यंत्रतंत्राच्या माध्यमातून कृषी  ग्रामजीवनात अनेक नवनवी साधनेहत्यारे अवतरली आहेतयामुळे कृषी  ग्राम जीवन पूर्णतबदलून गेले आहेनवनव्या तंत्रज्ञानाने सिंचनाच्या नव्या पद्धती अवतरल्या आहेतशेतकरी देखील आता काळाप्रमाणे बदलत अशा सहजसुलभ व्यवस्थेचा अंगीकार करू लागले आहेतसाधारणतः स्वातंत्रोत्तर काळात भारतीय शेतीमध्ये विविधांगी बदल सुरु झालेकेरोसिन वा इंधनाची उपलब्धता जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्याशी संबंधित साधनेही निर्माण होऊ लागलीयाच काळात यांत्रिकीकरणातून ‘इंजिन’ यापाणी उपसणाऱ्या साधनाचा जन्म झालायाचकाळात मोठ्या नद्यांवर मोठमोठे धरणे बांधली गेली.त्यामाध्यमातून कालवे  पाटांच्याद्वारे जलसिंचन प्रकल्प उभारले गेलेया धरण प्रकल्पाच्यारूपाने जलविद्युत या आणखी एका नव्या ऊर्जास्रोताचा जन्म झाला.
          या आधुनिक तथा यांत्रिक साधनांचा शेतीमध्ये वापर  वावर वाढू लागला आणि शेकडो वर्षपारंपरिक पद्धतीने पाटातून झुळझुळखळखळ नाद निर्माण करणारी मोट अंगणात तोंड खाली घालून बसू लागलीविहिरीवरची तिची ललकारी हळूहळू ठॉक ठॉकss ठॉक ठॉकss अशा कर्णकर्कश आवाजात रूपांतरित झालीजलविद्युत क्रांतीमुळं पुढील काळात विहिरीवरील उरल्या सुरल्या मोटा जाऊन तिथं विद्युत मोटारी बसल्याविहिरी शेजारी ‘इंजिनघर’ नावाच्या नव्यावास्तूचा अवतार झाला आणि धाव  वडवान उदास भासू लागलंकाळ लोटेल तसा यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढू लागलाआधी लोखंडी आणि नंतर प्लास्टिकचे पाईप निर्माण झालेथारूळ्यात पडून पाटानं झुळझुळू वाहणारं पाणीही थेट पिकाच्या वाफ्यात मूकपणे वाहू लागलेएवढं कमी होते की काय म्हणून आता तर ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी थेट पिकाच्या मुळातच टिपकत असताना दिसत आहेएके काळी ‘मोट चालली मळ्यात माझ्याचाकं वाजतंय कुई कुईपाटाचं पाणी झुळूझुळूवांनी फुलवत जातंय जाई जुई!!’ असं मळ्याच्या समृद्धीचं गाणंगाणारा मोटकरी मात्र आज मुकपणे या व्यवस्थेचा गोंगाट सहन करत आहे.
          एकेकाळी मोटंनं निर्माण केलेले वैभव आज आधुनिकीकरणाच्या क्रूर झडपेने उध्वस्थ केले गेलेआहेविहिरीवर रुबाबाने ताल धरणारी मोट मागील काही काळात अंगणात राहून कोंबड्या डालण्याचं वा इतर वस्तू झाकण्याचं कामं निमूटपणे करत होतीएक निर्जीव वस्तू म्हणून गप्प बसलेल्या या मोटेकडे बघताना मागील सारा काळ सजीव होऊन जाईतिला पाहून वा स्पर्श केल्याने तिच्या अस्तिवाचा  कर्तृत्वाचा आठव येईमात्र आज ती मोट अंगणातही दिसेनाशी झालीयकारण अंगणच नाहीसं झालंयकाळानुसार बदल होणं हा निसर्गाचा स्वभावच आहेमानव त्याला उपवाद नसेलचमात्र एकेकाळी लोकजीवनात अमाप सौख्य आणि अफाट वैभव उभा करणारी सिंचनाची ही पारंपरिक व्यवस्था हळूहळू डोळ्याआड होताना मनाला खूप वेदना होतातपरिवर्तन अटळ आहेनवसंस्कृतीचं निर्माणही अनिवार्यच आहेया बदलात नवनवे संस्कारनवे शब्दनव्या संकल्पना अवतरणारचंहे जगरहाटीच चक्रही सतत फिरतच राहणार आहेते सर्व स्वीकारावेच लागणारमात्र यामुळे आज अडगळीत पडलेल्या हा समृद्ध वारसा किती काळ टिकणार?
           मोटनाडासौंदरचाककणावडवानशिळवट ही केवळ साधने नव्हतीतर मानवी जीवनाच्या प्रगतीत मानसिक  भावनिक आधार  आकार देणाऱ्या अमूल्य ठेवी होत्याआज अडगळीत का होईना त्या दिसतात तरीमात्र धावपायटाथारुळंपाट या वास्तुंचं कायएकादवेळी अडगळीत असलेली समृद्धी अजूनही काही काळ जपता येईल अथवा टिकेलहीमात्र तो ललकारी देणारा मोटकरी आणि बांधावरून आरुळ्या ठोकणारा तो दारूळ्या कसा साठवायचाशिवाय अवघ्या गावात पहाटेची घुमणारी ती ललकारीचाककण्याची कुईकुई धून अन् पाण्याची मंजुळ झूळझूळ हा ध्वनीनाद कशा आळवायचा
                     एखादवेळी शब्दचित्रशिल्पलिपी या अक्षर साधनाद्वारे वा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे सर्व टिकवताही येईलपण त्या साधनांशी जोडले गेलेले आणि त्या साधनांमुळं जोडले गेलेले भावनिक नातं कसं जपायचंया सर्वच व्यवहारात  केवळ चैतन्यहीन निर्जीवता असेल नाही कानव्याचा उदय होताना जुन्याचं नष्ट होतं जाणं किती वेदणादायी असतं नाप्रयत्न व्हावा ही समृद्धी जपण्याचा
डॉ. अशोक शिंदे 
मोबाईल - ९८६०८५०३४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा